कृषि उत्पन्न बाजार समिती,अकलूज
शेतक-यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा,शेतमालाच्या विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये या उदात्त हेतूने कै.स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांनी २ मार्च १९५० रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. ७५ वर्षापूर्वी सुरू केलेली बाजार समिती महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळखली जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण माळशिरस तालुका असून आसपासच्या तालुक्यातील शेतकरीही खरेदी विक्रीसाठी या बाजार समितीमध्ये येत असतात. बाजार समितीचे मुख्य यार्ड अकलूज असून दुय्यम बाजारपेठ नातेपुते, माळशिरस,वेळापूर, पिलीव, शिंदेवाडी या ठिकाणी आहे. बाजार समितीच्या मालकीची जमीन अकलूज ४५ एकर, नातेपुते १९ एकर, शिंदेवाडी ३ एकर, माळशिरस ३ एकर अशी एकूण ७० एकर आहे.
सर्व माहितीसाठी....
